भूल भाग – ३
तिचे डोके गच्च भरले होते. राग, चिंता, किळस, चीड आणि उर्मीबद्दलची कणव. त्या राक्षसाने उर्मीच्या आयुश्याच्या चिंध्याच करायच्या ठरवल्या होत्या. काहीवेळा तर वाटत होते कि उर्मी भेटलीच नसती तर बरे झाले असते. तिचे जे काही होणार होते ते पल्लवीच्या नजरेआड झाले असते. पण आता ती डोळेझाक तर करू शकणार नव्हती. तिचा उर्मीवर खूप जीव होता. तिच्यासमोर उर्मी आणि तिच्या त्या दोन मुली सतत येत होत्या. त्यांचे आयुष्य तिने जवळून पहिले …