गाव तसं चांगलं … भाग – १
लेखक:- शब्दयात्री पतीच्या निधनानंतर आपल्या तीन लेकरांना घेऊन विजया सासरच्या गावी आली. तिचा पती वरिष्ठ पोलीस अधिकारी समरजित भालेराव. बिचारा, प्रामाणिक होता. म्हणूनच की काय ह्या जगाला मुकला. एका मोठ्या राजकारण्याचा वरदहस्त लाभलेल्या गुंड टोळीशी वैर पत्करल्याने अपघाताचा बनाव करून त्याला मारण्यात आले. कालपर्यंत आनंदी असणाऱ्या भालेराव कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. सरकारकडून कुटुंबाला थोडीशी आर्थिक मदत आणि एका व्यक्तीला सरकारी नोकरीचे आश्वासन दिले गेले. तिला तिच्या गावच्या ग्रामपंचायतीत नोकरी …