वश भाग २
कुबड्या मरून २० दिवस लोटले होते. जगात त्याच्या मारण्याची ना कोणाला फिकीर होती ना तसदी. त्यामुळे त्याचे क्रियाकर्म बेवारस म्हणून केले गेले. रात्रीच्यावेळी कचऱ्यातून कुबड्याला लागणाऱ्या गोष्टी गोळा करून नेताना त्याला एका भरधाव गाडीने उडवले होते. रात्रीची वेळ असल्यामुळे कोणीही पहिले नाही. पण मरणाआधी कूबड्याने गाडी ऊडवल्यावर त्याला बाहेर येऊन पाहणारे आणि तसेच निघून जाणारे गाडीतले ते जोडपे पाहीले होते. शहराच्या बाहेर असलेल्या नाल्याच्या कडेला असलेल्या ओसाड स्मशानात त्याच्या जळणाची …